नवी दिल्ली – हवामान बदलामुळे अनेक नैसर्गिक आपत्ती येत असून मानवाला या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आपल्याला भेडसावणाऱ्या आव्हानांनुसार सर्वांना जीवनशैलीत परिवर्तन करावे लागेल. आपल्याला कोणते उद्दिष्ट साध्य करायचे आहे आणि ते कसे साध्य करायचे आहे, यामधील तफावत भरून काढण्याला आपल्या चर्चेत प्राधान्य द्यायला हवे, असे केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल सचिव लीना नंदन म्हणाल्या.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने कॉप 27 परिषदेत भारतीय दालनात “शाश्वत जीवनासाठी तंत्रज्ञानाच्या मूल्यमापनाची आवश्यकता’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन केले होते. या प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी डॉ, निशा मेंदिरट्टा, प्रा. प्रदीप श्रीवास्तव, डॉ. राजेश पाठक, डॉ राजीव गर्ग उपस्थित होते.
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सचिवांनी कॉप 27 परिषदेतील भारतीय दालनात “शाश्वत जीवनासाठी तंत्रज्ञानाच्या मूल्यमापनाची आवश्यकता” या विषयावरील पॅनेल चर्चेत सहभाग घेतला.
📙https://t.co/3MgWvYyBrJ pic.twitter.com/vFJjWW1ZUr
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) November 11, 2022
लीना नंदन म्हणाल्या, भारतासह संपूर्ण जगाला आज तंत्रज्ञान हवे आहे, जे कार्बन उत्सर्जन करतात असे आढळून येते, केवळ त्यांच्यापुरती हवामान बदल ही समस्या मर्यादित नाही, हवामान बदल हे आपल्या इच्छेवर अवलंबून नसून ते आपल्या उंबरठ्यापर्यंत आले आहे, याची जाणीव आता मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे, असे त्या म्हणाल्या.
Meta Layoffs : चांगली नोकरी सोडून Meta जॉईन केले, मात्र दोनच दिवसात कंपनीने दाखवला बाहेरचा रस्ता
तंत्रज्ञान केवळ मोठ्या उद्योगांपुरते मर्यादित राहू शकत नाही. सूक्ष्म, लघु आणि माध्यम उद्योग तसेच स्टार्ट अप्स ना तंत्रज्ञानाचा उत्तम प्रकारे वापर करता यावा यासाठी त्यांना वित्तीयदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे, असेही लीना नंदन म्हणाल्या.