manoj jarange patil – मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि हजारो-लाखो आंदोलकांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे. कारण मराठा आंदोलनाच्या या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आज पहाटेच राज्य सरकारकडून त्याचे अध्यादेश काढण्यात आले आहेत.
अशात आज सकाळी १० च्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं. दरम्यान, यापूर्वी क्रेनमधून मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ऐकून सात मागण्या मान्य करण्यात आल्या आहे.
दरम्यान नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. सरकारने अध्यादेश जारी करत जरांगे यांच्यासह मराठा समाजाची मागणी मान्य केली आहे. हे यश मराठा समाजाचं असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या ‘या’ सात मागण्या अखेर मान्य करण्यात आल्या आहे.
१) ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत, अशा सगेसोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळणार.
२) राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार.
३) वंशावळी जोडण्याकरता तालुकास्तरावर समिती स्थापन. लो
४) मराठवाड्यातील नोंदी शोधण्याकरता शिंदे समितीला मुतदवाढ.
५) शिक्षणात मिळणार ओबीसीप्रमाणे सवलत.
६) मराठा आरक्षणासंदर्भात आगामी अधिवेशनात चर्चा होणार.
७) जात प्रमाणपत्र दिलेल्यांचा अहवाल देणार.