Manoj Jarange Patil On Modi shah : सरकराने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात आपला आक्रमक पणा कायम ठेवला आहे. ओबीसीमधूनच मराठा समाजाला आरक्षण घेऊन दाखवणार असा इशारा जरांगे वारंवार सरकारला देत आहेत. अशात जरांगे यांनी थेट मोदी शहांचे नाव घेऊन मोठं विधान केलं आहे.
जरांगे सध्या गावोगाव जाऊन मराठा बांधवांशी संवाद साधताहेत. अशात जरांगे यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून केलेलं एक विधान चांगलच चर्चेत आलं आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले होते तेव्हा त्यांच्यावर फुले उधळली नाहीत म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल केले आहेत असं विधान जरांगे पाटील यांनी केलं आहे. | Manoj Jarange Patil On Modi shah
सरकारने 10 टक्के आरक्षण दिले आणि EWS ही रद्द केले. आता सावध राहा, सरकार डाव टाकून मराठा समाज संपवत आहे. अशी टीका जरांगे यांनी केली. तसेच आपली जात खूप दिवसांनी एकत्र आली आहे. फुटू देऊ नका असंही जरांगे यावेळी म्हणाले. परभणीमध्ये मराठा बांधवांशी संवाद साधताना ते बोलत होते. | Manoj Jarange Patil On Modi shah
जरांगे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गुन्हा दखल करण्यात आला होता. आंदोलन होऊन गल्यानंतर कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होत असल्याचे सांगत जरांगे यांनी थेट मोदी शहाचं नाव घेऊन टीका केली. अमित शहा छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमरावतीत आले होते. तेव्हा त्यांच्यावर फुलं उधळली नाहीत. म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करत आहेत असा घणाघात जरांगे यांनी यावेळी केला. | Manoj Jarange Patil On Modi shah