जुन्नर -कुकडी उन्हाळी आवर्तनासाठी माणिकडोह धरणातून गेल्या 13 मार्चपासून सुरू असलेला विसर्ग सोमवारी (दि. 13) दुपारपासून बंद करण्यात येणार आहे. या कालावधीत 3 टीएमसी पाणी सोडण्यात आल्यानंतर धरणात सुमारे 11 टक्के उपयुक्त पाणीसाठा (1.25) शिल्लक
राहणार आहे.
जुन्नर शहर व परिसरातील शेतकऱ्यांसाठी माणिकडोह धरणातील 1 टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. हे आवर्तन प्रशासकीय नियोजनाप्रमाणे थांबविण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी सांगितले आहे.
श्रीगोंदा, पारनेरकरिता उन्हाळी आवर्तनासाठी माणिकडोह येथून 1200, पिंपळगाव जोगा धरणातून 200 आणि डिंभे डाव्या कालव्यातून 550 क्युसेकने पाणी येडगाव साठ्यात जमा होत आहे. हे आवर्तन पुढील 10 ते 12 दिवसांत संपणार आहे.