Mallikarjun Kharge – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून लष्करात नियमित सेवेत निवड होऊनही भरती न झालेल्या सुमारे दोन लाख तरुणांना न्याय द्यावा, अशी विनंती केली आहे. सरकारने त्यांची भरती थांबवून ‘अग्निपथ’ योजना आणली त्यामुळे या तरुणांना त्रास होत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांचे सरकार आल्यास अग्निपथ योजना मागे घेतली जाईल आणि जुनी व्यवस्था पूर्ववत केली जाईल, असे या पत्रात म्हटले आहे.
दोन लाख उमेदवारांचा स्वप्नभंग
खरगे यांनी पत्रात लिहिले आहे की, अलीकडेच मी या तरुणांना भेटलो. त्यांनी मला सांगितले की २०१९ ते २०२२ दरम्यान सुमारे दोन लाख उमेदवारांना सांगण्यात आले की त्यांची सेना, नौदल आणि हवाई दल या तीनही सशस्त्र सेवांमध्ये निवड झाली आहे. | Mallikarjun Kharge’s letter to the President
या तरुणांनी कठोर मानसिक आणि शारीरिक चाचण्या आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप संघर्ष केला होता. ३१ मे २०२२ पर्यंत, त्यांना विश्वास होता की त्यांनी त्यांची स्वप्ने पूर्ण केली आहेत आणि ते फक्त त्यांच्या नियुक्ती पत्राची वाट पाहत होते. त्या दिवशी ही भरती प्रक्रिया संपवून त्या जागी अग्निपथ योजना लागू करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयामुळे त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. | Mallikarjun Kharge’s letter to the President
My letter to the Hon’ble President of India (@rashtrapatibhvn) highlighting the gross injustice to almost two lakh young men and women whose future has become uncertain due to ending of regular recruitment process and imposing Agnipath Scheme for the Armed Forces by the Union… pic.twitter.com/nZceaXpKs0
— Mallikarjun Kharge (@kharge) February 26, 2024
लष्करात भरती न झाल्याच्या निराशेमुळे अनेकांनी आत्महत्या केल्याचा दावाही खर्गे यांनी केला. ते म्हणाले की, उमेदवारांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक वर्षे लागली. इतकेच नाही तर ५० लाख अर्जदारांना प्रत्येकी २५० रुपये जमा करावे लागले, ही या तरुणांकडून घेतलेली १२५ कोटी रुपयांची रक्कम कुठे गेली, तेही सरकारने जाहीर करावे. काॅंग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास अग्निपथ योजना मागे घेईल आणि जुनी भरती योजना लागू करेल, असे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. | Mallikarjun Kharge’s letter to the President