Mallikarjun Kharge On Narendra Modi : कॉंग्रेस संपली आहे असे मोदी वारंवार सांगत असतात, जर हे खरे असेल तर पंतप्रधान कॉंग्रेसची एवढी चिंता का करतात असा सवाल कॉंग्रेस अध्यक्ष प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे.
मतदानाच्या पहिल्या टप्प्यात मतदारांमध्ये सरकारच्या विरोधात जी सुप्त लाट दिसून आली आहे त्यातून मोदी घाबरले आहेत त्यामुळेच ते सतत कॉंग्रेसला लक्ष्य करीत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.
आज पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की मी जवळपास १०-१२ राज्यांमध्ये प्रवास केला आहे आणि तेथील मतदारांकडून पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.देशात मतदारांमध्ये सरकारच्या विरोधात सुप्त लाट आहे असे मला दिसून आले आहे, मोदींना त्याचीच भीती वाटू लागली आहे.
पंतप्रधान मोदी हे आता अत्यंत हीन राजकारण करू लागले असून त्यांनी देशाच्या इतिहासाबद्दल अधिक अभ्यास करण्याची गरज आहे. त्यातून त्यांनी देशाला एकसंध कसे ठेवायचे याचीही माहिती घ्यावी अशी सुचनाही खर्गे यांनी यावेळी केली.