वाघोली- पुणे जिल्हातील सर्व ग्रामपंचायती अडथळामुक्त करावे, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या कार्याध्यक्ष सुप्रिया लोखंडे, यानी लेखी निवेदनाद्वारे मुख्यकार्यकारी, जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, पुणे जिल्हातील बहुसंख्य ग्रामपंचायत पहिल्या मजल्यावर आहेत.
ज्या खालच्या मजल्यावर आहेत. त्या अडचणीयुक्त आहेत. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या अंध, अंपग बांधवांना अडचणींना सामारे जावे लागते. गावच्या ग्रामसभेमध्ये सहभागी होता येत नाही. शासकिय इमारती अडथळाविरहीत असावे, असा कायदा आहे. परंतु कायद्याची अंमलबजावणी होत नाहीत. त्यामुळे प्रहार संघटनेच्या लोखंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.