संगमनेर -नगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सहकारासह विविध क्षेत्रांच्या विकासासाठी अर्थपुरवठा करण्याचे काम जिल्हा बॅंक करते. शिस्त व काटकसर हे बॅंकेचे वैशिष्ट्य असून, कृषी क्षेत्रासह जिल्ह्याच्या विकासात जिल्हा बॅंकेचे योगदान मोठे असल्याचे गौरवोद्गार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.
नगरपालिकेसमोर जिल्हा बॅंकेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन सोशल डिस्टनचे पालन करून करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी बॅंकेचे अध्यक्ष सीताराम पा. गायकर होते. व्यासपीठावर आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव पा. खेमनर, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, बॅंकेचे उपाध्यक्ष रामदास पाटील वाघ, कारखान्याचे माजी अध्यक्ष ऍड. माधवराव कानवडे, शिवाजीराव थोरात, अमित पंडित, लक्ष्मणराव कुटे, संपतराव डोंगरे, साहेबराव गडाख, किशोर टोकसे, संतोष हासे, नितीन अभंग, शैलेश कलंत्री, प्रा. डी. बी. राठी, विश्वनाथ राठी, विष्णुपंत रहाटळ, कचरु पा. शेटे, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, तालुका विकास अधिकारी बापूसाहेब गिरी उपस्थित होते.
ना. थोरात म्हणाले, आज बॅंक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कामधेनू ठरली आहे. बॅंकेने एक लाखापर्यंत शून्य टक्के व्याज दराने शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवले आहे. महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या कर्जमाफीचा अनेक शेतकऱ्यांना बॅंकेच्या माध्यमातून लाभ झाला आहे.
यावेळी दत्तू खुळे, सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, भारत शेरकर, गुलाबराव ढोले, जनरल मॅनेजर जयंत देशमुख, सुरेश पाटील, अशोक थोरात, रमेश मंडलीक, पचपिंड, भगीरथ डोईफोडे, बाळासाहेब चौधरी, भाऊसाहेब कोटकर, किशोर खेमनर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक वर्पे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले, तर बॅंकेचे उपाध्यक्ष रामदास पाटील यांनी आभार मानले.