कुरवली- इंदापूरच्या पश्चिम भागातील तावशी, उद्घट, जांब, कुरवली, चिखली, मानकरवाडी परिसरात मका, गहु, ज्वारी पीके तरारली आहेत. यंदा धरण परिसरात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे तसेच परतीच्या पावसामुळे निरा नदीत पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या ज्वारी पीक जोमात आले, असून शेतकऱ्यांना पिकांची राखण करताना दमछाक होत आहे. सकाळी दिवसाला सुरुवात झाल्यापासून
कडक उन जाणवू लागले आहे. सकाळपासून संध्याकाळ पर्यंत हातात गोफण व दगड घेऊन उन्हा-तान्हात पिकांची राखण करताना बळीराजा मेटाकुटीला येत आहे. यावर उपाय म्हणून काही शेतकऱ्यांनी या पिकांच्या राखण्याची जबाबदारी रंगीत प्लॅस्टिक कॅरीबॅग यांच्यावर सोपवली आहे. तर काही शेतकऱ्यांनी जुन्या ऑडिओ कॅसेटच्या रीळचा उपयोग करून पूर्ण पिकांवर रीळ लावून पिकांची राखण केली जात आहे. रंगीबेरंगी पिशवीला पाहून व वाऱ्याने फडफडणाऱ्या रीळचा आवाज ऐकून पक्षी ज्वारी पिकांकडे फिरकत नाहीत. त्यामुळे पिकांचे संरक्षण होत अस आहे.