मुंबई : कोरोना विषाणूने जगभरात दहशत निर्माण केली आहे. कोरोना विषाणूचा फटका आता राजकीय पक्षांना देखील बसायला सुरवात झाली आहे.
कोरोना विषाणूचे गांभीर्य लक्षात घेतला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) आपला गुढीपाडवा मेळावा रद्द करण्याची घोषणा केली आहे. मनसेच्या ट्वीटर अकाऊंटवरून गुढीपाडवा मेळावा रद्द करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
‘कोरोना’चं सावट गडद आहे. या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द करत आहोत’, असे मनसेने स्पष्ट केले आहे.
तसेच, ‘येत्या काही आठवड्यात राज्यात महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. पण, एकूण परिस्थिती पाहता सरकारने या निवडणुका किमान सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात याव्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे.
‘कोरोना’चं सावट गडद आहे त्यामुळे ह्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द करत आहोत.
तसंच येत्या काही आठवड्यात महापालिकांच्या निवडणूका होणार आहेत पण एकूण परिस्थिती पाहता सरकारने ह्या निवडणुका किमान सहा महिन्यांसाठी पुढे ढकलाव्यात. pic.twitter.com/DWbkrjLBTQ— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 14, 2020
दरम्यान आतापर्यंत राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेले १९ रुग्ण आढळले असून त्यांच्यावर विलीगीकरण कक्षात उपचार सुरु आहेत. नागरिकांनी कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी अशी सूचना केली आहे. दरम्यान या विषाणूमुळे भारतात दोघांचा मृत्यू झाला असून ८२ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.