पुणे – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत यजमान महाराष्ट्राविरुद्धच्या लढतीत झारखंडने पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा आपल्या पहिल्या डावात ५ बाद २९२ अशी भक्कम मजल मारली होती. झारखंडकडून कर्णधार विराट सिंगने शतकी खेळी केली तर कुमार सुरजने ८३ धावांची उपयुक्त खेळी करत डाव सावरला.
महाराष्ट्राचा कर्णधार केदार जाधवने नाणेफेक जिंकत झारखंडला पहिल्यांदा फलंदाजी दिली. कुमार देवव्रत (३१) व नजीम सिद्दीकी (२७) यांनी अर्धशतकी सलामी दिली. मात्र, हे दोघे पाठोपाठ बाद झाल्यावर कुमार सुरज व विराट सिंग यांनी महाराष्ट्राच्या गोलंदाजीचा समर्थपणे सामना केला. या जोडीने शतकी भागीदारी करताना संघाचे शतक तर फलकावर लावलेच मात्र, आपापली अर्धशतकेही पूर्ण केली.
Stumps Day 1: Jharkhand – 292/5 in 88.6 overs (Kumar Kushagra 32 off 83, Anukul Roy 2 off 15) #MAHvJHA #RanjiTrophy #Elite
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 12, 2024
कुमार शतकाकडे कूच करत असताना ८३ धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने १५६ चेंडूत ११ चौकार व १ षटकार खेचला. विराट सिंगने मात्र, शतक साकार केले. अर्थात त्यानंतर तो लगेचच बाद झाला. त्याने १०८ धावांच्या खेळीत १७१ चेंडूत ८ चौकार व ३ षटकार फटकावले. त्यापूर्वी त्याने संघाला द्विशतकी मजल मारुन दिली. सौरभ तिवारीने साफ निराशा केली. मात्र, त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज कुमार कुशाग्राने नाबाद ३२ धावांची खेळी करत अनुकुल रॉयसह (नाबाद २ धावा) दिवसातील उर्वरीत षटके खेळून काढताना आणखी नुकसान होऊ दिले नाही. महाराष्ट्राकडून हितेश वळुंजने ३ तर आशय पालकरने २ बळी मिळवले.
NZ vs PAK : कोरोनाचा क्रिकेट विश्वात पुन्हा शिरकाव, न्यूझीलंडच्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूला झाली लागण…
संक्षिप्त धावफलक – झारखंड पहिला डाव – ८९ षटकांत ५ बाद २९२ धावा. (विराट सिंग १०८, कुमार सुरज ८३, कुमार देवव्रत ३१, नजीम सिद्दीकी २७, हितेश वळुंज ३-७६, आशय पालकर २-४७).