मुंबई – अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण सोहळ्यासाठी देशभरातील दिग्गज नेत्यांना निमंत्रण देण्यात येत आहे. त्यातच राज्यात महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनादेखील निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले नाही.
त्यावरून सध्या राज्यात राजकीय वर्तुळात गोंधळ निर्माण झाला आहे. अशात हनुमानगढी मंदिराचे पुजारी राजूदास महाराज यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. राजूदास महाराज म्हणाले,’मुंबईकरांनी अयोध्येत येऊन मंदिर निर्माण करण्यात मोठा वाटा उचलला. बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं की बाबरीचा ढाचा माझ्या लोकांनी पाडला त्याचा मला अभिमान आहे. असा नेता पुन्हा होणार नाही.” असं महाराज म्हणाले.
ते पुढे म्हणाले,’आज बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा रडत असणार हे नक्की. कारण आत्ता ज्या प्रकारचं राजकारण उद्धव ठाकरेंनी केलं त्या राजकारणाला तिलांजली देण्याचे विचार बाळासाहेबांचे होते. राम विद्रोहींबरोबर मिळालेली सत्ता त्यांनी घेतली नसती. दुर्भाग्य आहे की यांना सोनिया गांधी पाय धरायला मिळाले.” त्यांना निमंत्रणाचा प्रश्न आहे त्याबाबत मी सांगेन रामाला ज्याने नाकारलं, भाजपाचा इव्हेंट आहे म्हटलं त्या उद्धव ठाकरेंची अवस्था काय आहे? त्यांचा पक्ष फुटला, येणारा निधी थांबला, अनेकांना तुरुंगात जावं लागलं. अशी टीकाही राजूदास महाराजांनी केली. दरम्यान यापूर्वीही आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला महंत राजू दास यांनी विरोध केला होता.