बेंगळुरू – मध्य प्रदेश संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईचा पराभव करून रणजी करंडक 2021-22 चे विजेतेपद पटकावले. मध्य प्रदेश संघाने प्रथमच ही स्पर्धा जिंकली आहे. एम चिन्नास्वामी, बेंगळुरू येथे झालेल्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशने मुंबईचा सहा गडी राखून पराभव केला.
𝗪𝗛𝗔𝗧. 𝗔. 𝗪𝗜𝗡! 👏 👏
Madhya Pradesh beat Mumbai by 6 wickets & clinch their maiden #RanjiTrophy title👍 👍 @Paytm | #Final | #MPvMUM
Scorecard ▶️ https://t.co/xwAZ13D0nP pic.twitter.com/XrSp2YzwSu
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 26, 2022
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात 374 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशने 536 धावांची मोठी मजल मारली. दुसऱ्या डावात मुंबईच्या संघाला 269 च धावा करत्या आल्या त्यामुळे सामन्याच्या चौथ्या डावात मध्य प्रदेशसमोर 108 धावांचे लक्ष्य होते. मध्य प्रदेशने सहा गडी गमावून हे लक्ष्य गाठले आणि विजेतेपद पटकावले. यासह रणजी ट्राफी जिंकणारा मध्य प्रदेश हा 20 वा संघ ठरला.
संपूर्ण टीमला दोन कोटीचे बक्षीस
या विजयामुळे मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन (एमपीसीए) ने रणजी करंडक जिंकणाऱ्या संघाला दोन कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिलाष खांडेकर म्हणाले, “संघाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आहे. मध्य प्रदेशसाठी हे अभूतपूर्व यश आहे. हा विजय संपूर्ण राज्यातील जनतेला समर्पित आहे. चंद्रकांत पंडित आणि टीमच्या सर्व सदस्यांनी उत्तम काम केले आहे. एमपीसीएतर्फे संपूर्ण टीमला 2 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल.
मध्य प्रदेशकडून यश दुबे आणि शुभम शर्मा आणि रजत पाटीदार यांनी शतके झळकावली. त्याचवेळी सर्फराज खानने मुंबईसाठी शतक झळकावले. गोलंदाजीत मध्य प्रदेशच्या गौरव कुमारने सहा आणि कुमार कार्तिकेयने पाच बळी घेतले. त्याचवेळी मुंबईच्या शम्स मुलाणीने सर्वाधिक आठ विकेट घेतल्या.
गेल्या काही वर्षांत रणजीमध्ये नवे संघ उदयास येत आहेत. 2014-15 पासून आतापर्यंत सहा वेगवेगळ्या संघांनी आठ हंगामात विजेतेपद पटकावले आहे. 2014-15 मध्ये कर्नाटक, 2015-16 मध्ये मुंबई, 2016-17 मध्ये गुजरात, 2017-18 आणि 2018-19 मध्ये विदर्भ, 2019-20 मध्ये सौराष्ट्र आणि 2021-22 मध्ये मध्य प्रदेश चॅम्पियन बनले आहेत. 2020-21 मध्ये कोरोनामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती.