चाकण, (वार्ताहर) – आगामी लोकसभेची निवडणूक लोकशाहीची सत्वपरीक्षा असून संविधान बासनात गुंडाळून भारतामध्ये अध्यक्षीय राजवट राबविण्याचा अजेंडा केंद्र सरकार करत असल्याचा घणाघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संजय जगताप यांनी केला. राजगुरूनगर येथे खेड तालुका युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या असंख्य महिला व पुरुष कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या प्रसंगी आमदार जगताप बोलत होते.
यावेळी खेड विधानसभेचे निरीक्षक तथा प्रवक्ते निखील कवेश्वर, पुणे जिल्हा प्रवक्ते पृथ्वीराज पाटील, महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेसच्या सरचिटणीस वंदना सातपुते, महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस अमोल दौंडकर, पुणे जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष जमीर काझी, पुणे जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत गोरे, लीगल सेलचे पुणे जिल्हा अध्यक्ष जया मोरे,
खेड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अनुराग जैद, युवक काँग्रेस पुणे जिल्हा उपाध्यक्षअतिश मांजरे, खेड पंचायत समितीचे माजी सभापती सतीश राक्षे, खेड किसान सेल काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष होले. खेड महिला अध्यक्षा गिताबाई मांडेकर, चाकण शहर अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, खेड युवक अध्यक्ष अॅड. गणेश सहाणे, उपाध्यक्ष निखील थिगळ, सदस्य सुनील मिंडे, सचिव धनेश म्हसे, दीपक थिगळे, पंडित पवार, उमेश रानवडे आदी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले की, ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषद अथवा महानगरपालिकेपर्यंत लोकनियुक्तऐवजी शासन नियुक्त प्रतिनिधी नेमून लोकशाहीच्या अंगावरून बुलडोझर फिरवायचे काम शासनामार्फत सुरू आहे. असा प्रयोग नुकताच पुणे शहरात करण्यात आला आहे.
दरम्यान, यावेळी अॅड कावेरी गुंजाळ-राळे, अॅड. अभिजीत कड, मंगल काळे, काजल होनगे, कृष्णाबाई कारले, विश्वनाथ गायकवाड, युवराज कोबल, तानाजी पारधी, सागर पाटीलबुवा दौंडकर, रमेश नेहरे, रामदास गोळे, तानाजी डांगले, रामभाऊ डांगले, सुरेश मोहन, अविनाश राळे, वैभव राळे, काळूराम कड, प्रवीण बेंडभर आदींनी जगताप यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अमोल दौंडकर यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.