हिंगोली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघात ( Hingoli Lok Sabha constituency) जाहीर केलेला उमेदवार बदलला आहे.
पहिल्या यादीमध्ये हेमंत पाटील (Hemant Patil) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र पाटील यांच्या उमेदवारीमुळे हिंगोलीमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आता भाजपच्या दबावामुळे एकनाथ शिंदे यांना हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करावी लागली आहे. त्यांच्या जागी आता बाबूराव कदम कोहळीकर (Baburao kadam )यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हेमंत पाटील यांचा पत्ता कट करून बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे येथील उमेदवार बदलण्याची नामुष्की शिंदे गटावर आली आहे.
दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून अत्यंत चर्चेचा मुद्दा झालेल्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी यांचा सुद्धा पत्ता कट करण्यात आला आहे. या ठिकाणी राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटातील तीन खासदारांचा पत्ता कट झाला आहे.