Lok Sabha Election 2024 Prime Minister Narendra Modi’s speech in Chandrapur – चंद्रपूर शहराजवळ मोरवा विमानतळाच्या बाजूला विस्तीर्ण 16 एकर परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज जाहीर सभा पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील विदर्भातील महायुतीचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपूरात सभा पार पडली.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह महायुतीच्या बड्या नेत्यांची उपस्थिती होती. चंद्रपूरसह विदर्भातील गडचिरोली, भंडारा-गोंदीया, नागपूर, रामटेक मतदारसंघांसाठी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान होणार आहे. पीएम मोदींच्या सभेला यावेळी मोठी गर्दी जमली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चंद्रपुरातील भाषणातील महत्वाचे मुद्दे –
– माता महाकालीच्या पावनभूमीत व डॉ. बाबासाहेब यांना यांना अभिवादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठीतून भाषणाची सुरूवात केली.
– बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेण्याचे काम एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी करत आहेत. तर नकली शिवसेनेवाले हे हिंदुत्वाला शिव्या देणाऱ्या डीएकमेवाल्यांना महाराष्ट्रात आणून रॅली करतात, कॉंग्रेससोबत नकली शिवसेना आहे. काश्मीरी पंडीतांचे घरे जाळले जात होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरे पुढे आले. तेव्हा त्यांनी असे म्हटले नाही की, काश्मीरमध्ये घडले मग महाराष्ट्रात का बोलायचे. मला अभिमान आहे की, एकनाथ शिंदे व त्यांची पार्टी बाळासाहेबांच्या विचारांना पुढे घेऊन चालली आहे. कॉंग्रेससोबत सद्या नकली शिवसेना आहे.
– कॉंग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांनी केवळ परिवारांचा विकास केला. त्यांना देशाचं काही देणं-घेणं नाही. कॉंग्रेस म्हणजे कडू कारल्यासारखे आहे. ते कधीच सुधरू शकत नाही.
– लोकसभा 2024 ची निवडणूक ही स्थिरता विरुद्ध अस्थिरता याच्यामधली आहे. एकीकडे भाजपप्रणित एनडीए आहे. या एनडीएचे ध्येय हे देशासाठी मोठे निर्णय घेण्याचे आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि इंडिया आघाडी आहे, त्यांचा मंत्र आहे की, जिथे सत्ता मिळेल तिथे खूप मलाई खावी. इंडिया आघाडी नेहमी देशाला अस्थितरतेकडे नेले आहे. एका स्थिर सरकारची आवश्यकता किती आहे हे महाराष्ट्राशिवाय कोण सांगू शकेल.
– इंडिया आघाडीवाले राज्यात वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून सत्तेत आले तेव्हा त्यांनी फक्त स्वत:चा विकास केला. स्वत:च्या कुटुंबाचा विकास केला. कुणाचा किती वाटा असेल, कुणाला कोणतं कंत्राट मिळेल, मलाईदार पोस्ट कुणाच्या खात्यात आणि किती येणार या हिशोबातच यांनी पूर्ण महाराष्ट्राचे भविष्य गुरफटून टाकले होते. महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित प्रोजेक्ट पाहिल्यावर हे म्हणायचे की, कमिशन आणा नाहीतर काम बंद करा. या लोकांनी जलयुक्त शिवार योजना बंद केली. बळीराजा जलसिंजवनी योजना बंद केली. विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनासाठी योजना होती ती योजनाही त्यांनी ठप्प केली होती.
– देशाचं विभाजन कुणी केलं? काश्मीरचा प्रश्न कुणी प्रलंबित ठेवला? आतंकवाद कुणामुळे निर्माण झाला? बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कारापासून वंचित कोण ठेवले?. आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रातच नाही तर देशभरात नक्षलवाद कमजोर पडला आहे. गडचिरोली आता पोलादाचे शहर म्हणून ओळखला जाते. कडू कारले साखरात घोळा किंवा तुपात तळा, ते कडूच राहणार, अशी कॉंग्रेसची अवस्था आहे. ते कधीच सुधरू शकत नाही.
– निवडणुकीपर्यंत घर घर जाऊन सांगा की, नरेंद्र मोदी चंद्रपूरात आले होते त्यांना सांगा की, नरेंद्र मोदी यांनी प्रणाम केला आहे. माझा निरोप लोकांपर्यंत पोहोचवा.
– कॉंग्रेसच्या काळात सातत्याने दहशतवादी हल्ले झाले. यांनी देशाला धोका दिला आहे. इंडिया आघाडीवाले यांनी केवळ परिवारांचा विकास केला.
– चंद्रपूरकरांनी देखील यावेळी निर्धार केलेला आहे. यावेळी फिर एक बार भाजप सरकार येणार आहे. या चंद्रपूराने राम मंदिराच्या निर्मितीसाठी लाकूड पाठवले. नवीन संसदेच्या निर्मितीत देखील चंद्रपूरातील लाकूड मिळाले आहे. चंद्रपूराची ख्याती देशभरात पोहोचली आहे.
– जेव्हा इंडिया आघाडीवाले खूप सारे षडयंत्र रचून राज्यातील सत्तेवर आले. तरी देखील त्यांनी स्वत:चा परिवाराचा विकास केला. कोणते कंत्राटदार कोणाला मिळेल, कोणाला किती मलाई मिळेल, असे सरकार चालू होते. महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने एकही योजना प्रोजेक्ट केला नाही. जलयुक्त योजना बंद करून टाकली. सिंचन योजना बंद केली. समृद्धी महामार्गाला विरोध केला, मुंबईत मेट्रो बंद पाडली, गरीबांना घर देणे बंद केले.
– कमिशन द्या, नाहीतर काम बंद करा, असे महाविकास आघाडी सरकारचे काम होते.