बारामती (प्रतिनिधी) : बारामती शहरातील नीरा डावा कालवा लगत असलेले दत्त मंदिर रात्रीत हटविण्यात आले आहे. शहरातील निरा डावा कालव्याचे सुशोभीकरणाचे काम सुरू असून त्यानुषंगाने हे मंदिर हटविण्यात आले आले आहे. यापूर्वी बारामती नगर परिषदेची ऐतिहासिक कमान देखील रात्रीत पाडण्यात आली होती. त्यामुळे सोशल मीडियावर प्रशासनाच्या विरोधात टीकेची झोड उठली आहे. संतप्त प्रतिक्रिया देखील व्यक्त होत आहेत.
राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर बारामतीत विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून हा निधी मिळाला आहे.त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. शहरातील निरा डावा कालव्याचे सुशोभीकरणाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. शहरातून जात असलेल्या निरा डावा कालव्याचे सहा किलोमीटर अंतरावर सुशोभीकरण होत आहे. या या सुशोभीकरण यामुळे शहरातील सौंदर्यात भर पडणार आहे. असे असले अनेक वर्षापासून नीरा डावा कालवा लगत असलेले दत्त मंदिर रात्रीत हटविण्यात आले आहे. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
यापूर्वी बारामती नगरपरिषदेची ऐतिहासिक कमान देखील रात्रीत पाडण्यात आली होती. त्यावेळी देखील प्रशासनावर टीकेची झोड उठली होती. ऐतिहासिक कमानीच्या जागेवर दुसरी कमान पूर्णत्वास आली आहे. रात्रीत हटविण्यात आलेले दत्त मंदिर दुसरी पर्यायी जागा उपलब्ध होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.