कंगना राणावत ही बॉलिवूडची सर्वात पॉवरफुल अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. कंगना तिच्या चोख उत्तरांनी भल्याभल्यांचे तोंड बंद करते. कंगनाही तिच्या लव्ह लाईफमुळे अनेकदा चर्चेत आली आहे. कंगना राणावतची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे, परंतु तरीही ती लग्न करू शकणार नाही असे तिला वाटते. आता याचे कारण काय, याचा खुलासाही कंगनाने स्वःताहाच केला आहे.
कंगना लग्न का करत नाही?
कंगना राणावतने तिच्या एका नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,’मी लग्न करू शकत नाही, कारण लोक माझ्याबद्दल अशा अफवा पसरवत आहेत की मी खूप भांडखोर आहे आणि लोकांशी जबरदस्तीने भांडते.
पुढे कंगनाने मुलाखतीत गंमतीने सांगितले की,’अशा अफवांमुळे माझ्याबद्दल एक नकारात्मक विचार निर्माण झाला आहे, त्यामुळे मला परफेक्ट मॅच मिळत नाहीये.’
कंगनाचा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट ‘धाकड’ लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात कंगना अॅक्शन करतानाही दिसणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशन वेळी तिला प्रश्न विचारण्यात आला की,’खऱ्या आयुष्यातही धाकड चित्रपटातील भूमिकेप्रमाणे तुझी पर्सनॅलिटी आहे का? यावर कंगना हसली आणि म्हणाली असे नाही. खऱ्या आयुष्यात मी कोणाला मारणार? मी लग्न करू शकत नाही कारण तुम्ही लोक माझ्याबद्दल नकारात्मक अफवा पसरवत असता.
अर्जुन रामपालने केले कंगनाचे कौतुक
या प्रोमोशनदरम्यान कंगनाच्या ‘धाकड’ चित्रपटाचा सहकलाकार अर्जुन रामपाल त्याच्यासोबत उपस्थित होता. यावेळी अर्जुनला कंगना सोबत काम करण्याचा अनुभव विचारण्यात आला. त्यावर अर्जुन रामपाल म्हणाला,’मी कंगनाबद्दल एवढेच म्हणेन की ती एक अप्रतिम अभिनेत्री आहे. ती जे काही करते, ते तिच्या भूमिकेसाठी करते, पण खऱ्या आयुष्यात ती तशी नाही. कंगना खऱ्या आयुष्यात खूप गोड, प्रेमळ आहे. ‘
दुसरीकडे, कंगनाच्या ‘धाकड’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर त्यात अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 20 मे रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो, हे प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.