पुणे – काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा कसबा पोटनिवडणुकीत पराभव केल्यानंतर आता सर्वसामान्यांमधून देखील याबाबतच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात विजयाचा गुलाल उधळला. भाजपच्या दिवंगत नेत्या मुक्त टिळक यांच्या निधनानंतर या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीच्या निकालानंतर मुक्त टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप कुठे कमी पडलं हे पाहावं लागेल असं स्पष्ट मत टिळक यांनी व्यक्त केलं.
खर तर मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपने त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी न देता हेमंत रासने यांना मैदानात उतरवले यामुळे ही निवडणूक बिनविरोध मी होता महाविकास आघाडीने आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला. भाजपला मोठा धक्का देत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी तब्बल ११ हजरांहुन अधिक मताधिक्य घेत विजय सुनिश्चित केला.
काय म्हणाले कुणाला टिळक नेमकं
कुणाल टिळक यांनी रवींद्र धंगेकर यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी निकालावर भाष्य केले. अकरा हजाराने सीट का गेली याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. कोणत्या प्रभागात मतदान झालं नाही. कोणत्या बुथवर आम्ही कमी पडलो त्याचा अभ्यास करावा लागले. एका दिवसात विश्लेषण करण अवघड आहे परंतु याचा अभयास करणं गरजेचं आहे असं कुणाल टिळक यावेळी म्हणाले.
अशी झाली फाईट
बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघामध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी निर्णायक आघाडी घेतली. त्यामुळे भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून धंगेकर यांनी तब्बल 6 हजार 700 मतांनी आघाडी घेतली होती. पुढे त्यांनी हे लीड कायम ठेवत विजयाकडे घौडदौड केली आणि 11 हजार 40 मतांनी धंगेकर विजयी झाले.