हेडिंग्ले – विजयी संघ कायम ठेवायचा ही भारतीय कर्णधार विराट कोहलीची अंधश्रद्धा संपूर्ण संघाला भोवली. नाणेफेक करण्यापूर्वी खेळपट्टी पाहिल्यावर तसेच संघात चार वेगवान गोलंदाज असताना आणि वातावरणही वेगवान गोलंदाजीला मदत करणारे असतानाही कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याऐवजी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा फटका संघाला बसला.
तिसऱ्या सामन्यापूर्वी कोहलीने खेळपट्टी पाहिली होती. खेळपट्टीवर फारसे गवत राखलेले नव्हते, त्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळणार नाही, असा कोहलीचा ग्रह झाला. मात्र, विजयी संघात बदल करणार नाही ही कोहलीची अंधश्रद्धा आहे.
त्यामुळेच त्याने फलंदाजीचा निर्णय घेतला व तिथेच सामना भारताच्या हातातून निसटला. लॉर्ड्स कसोटीच्या विजयी संघात चार वेगवान गोलंदाजांचा समावेश होता हाच संघ कोहलीने कयम ठेवला.
त्याऐवजी विजयी संघात बदल करत रवीचंद्रन अश्विनला का घेतले नाही, अशी टीका आता होऊ लागली आहे.