मुंबई – बर्मिंगहॅममध्ये नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी तब्बल 61 पदकांची कमाई केली. खेळाडूंच्या या आफलातून यशावर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्याने सर्व खेळाडूंचे कौतुकही केले आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण 22 सुवर्ण,16 रजत व23 ब्रॉंझपदके मिळवली. भारत पदक तालिकेत चौथ्या स्थानावर राहिला. विशेष म्हणजे भारत गेल्या सहा राष्ट्रकुल स्पर्धेत पदक तालिकेत पहिल्या पाचमध्ये आहे. भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर कोहलीने सलाम केला आहे.
You have brought great laurels for our country. Congratulations to all our winners and the participants of CWG 2022. We are so proud of you. Jai Hind 🇮🇳👏 pic.twitter.com/phKMn7MMdY
— Virat Kohli (@imVkohli) August 9, 2022
तुम्ही सर्वांनी देशाचा गौरव केला आहे. आपल्या सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन. आम्हाला तुमचा अभिमान आहे. जय हिंद, अशा शब्दात कोहलीने खेळाडूंचे कौतुक केले आहे.
भारताने यावेळी 61 पदके जिंकली. जरी भारताला गोल्ड कोस्ट गेम्समधून पदकांची संख्या गाठता आली नसली तरी, नेमबाजी खेळाची अनुपस्थिती नुकसाकारक ठरली.