नवी दिल्ली – भारत आणि आफ्रिके यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दोन सामने झाले असून यात १-१ अशी बरोबरी झाली आहे. तिसरी आणि निर्णायक कसोटी मालिकेतील विजेता संघ ठरवणार आहे. तिसऱ्या कसोटीसाठी कर्णधार विराट कोहलीने संघात मोठा बदल केल्याचे सांगण्यात आलं आहे.
तिसरा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर भारताने आतापर्यंत एकदाही कसोटी मालिका जिंकलेली नाही. भारताला आता ईतिहास घडविण्याची संधी असून त्यामुळे कोहलीने शेवटच्या सामन्यासाठी संघात मोठे बदल केले आहेत.
भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्मा याच्या गैरहजेरीत मयांक आणि राहुल यांची जोडी सामन्याची सुरुवात करणार असून त्यांनी या आधी पण ही जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळली आहे. राहुलने पहिल्या सामन्यात १२३ धावा काढून शतक ठोकले होते. तर मयांक याने थोडीच परंतु चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे ही जोडी सुरुवातीला उतरवण्याचे कर्णधार कोहली ने ठरवले आहे. तसेच तिसऱ्या स्थानी चेतेश्वर पुजारा हा खेळणार असून त्याने पहिल्या सामन्यात अर्ध शतक केले होते. कर्णधार कोहली चौथ्या स्थानावर खेळणार असून दुसऱ्या सामान्या वेळी त्यांला दुखापतीमुळे मैदानाच्या बाहेर राहावे लागले.
अजिंक्य राहणे पाचव्या स्थानी खेळणार असून राहणे आणि पुजारा या दोघांनी दुसऱ्या कसोटीत अर्धशतके झळकावली होती. तर पंतला देखील संधी देण्यात येणार असल्याचे कळतं. पंत सहाव्या स्थानावर खेळणार असून मागील सलग १३ सामन्यात त्याच्या हाती अपयश आले होते. सध्या पंत हा भारतातील सर्वात उत्कृष्ट यष्टीरक्षक मनाला जातो.
गोलंदाजीमध्ये परत एकदा जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी याची वर्णी लागणार असून तिसऱ्या सामान्यसाठी मोहम्मद सिराज ऐवजी उमेश यादव याला संधी मिळू शकते. तसेच रविचंद्रन अश्विनवर मोठी जबाबदारी असणार आहे.
संभाव्य भारतीय संघ
विराट कोहली(कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, रविचंद्रन अश्विन, ऋषभ पंत, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकुर.