मुंबई – मराठी सिनेमासृष्टीतील अभिनेत्री ‘केतकी चितळे’ ही तिच्या अभिनयापेक्षा वेगळ्याच कारणाने नेहमी चर्चेत असते. तिच्या सोशल मीडियावरील काही पोस्ट अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. केतकीच्या काही अशाही पोस्ट आहेत ज्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केले आहे. आता पुन्हा एकदा तिने आपल्या सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट शेअर केली आहे.
ज्यामध्ये केतकीने तिच्या स्टाइलने सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत काही प्रश्न देखील विचारले आहेत. तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीमध्ये हे प्रश्न विचारले आहे. मात्र, आता केतकीचे ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून, अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात देखील केली आहे.
आज महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा 62 वा महाराष्ट्र दिन. मुंबई या द्विभाषिक राज्यातून आपापली भाषा बोलणारी स्वतंत्र राज्य असावी असा आग्रह मराठी आणि गुजराती लोकांनी धरला होता. यावरूनच 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची विभागणी करण्यात आली आणि स्वतंत्र महाराष्ट्र उदयास आले. आणि याच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सामान्य नागरिक तसेच अनेक मराठी कलाकार महाराष्ट्राचा गौरव करणाऱ्या पोस्ट करत आहेत.
केतकी चितळेने विचारले हे खास प्रश्न…
किती जणांना मारून टाकण्यात आले?, कुणाच्या वृत्तपत्राचे प्रमुख योगदान ठरले संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत?, बॉम्बेचे पहिले मुख्यमंत्री कोण?, फ्लोरा फाउंटनचे हुतात्मा चौक कधी झाले? असे सवाल विचारून केतकीची पोस्ट महाराष्ट्र दिनी पुन्हा चर्चेत आलीय.