वाघोली – केसनंद तालुका हवेली येथे संगीता प्रमोद हरगुडे यांनी पाटील वस्ती येथे दुग्ध व्यवसाय कामी विजेचे कनेक्शन ची मागणी केली होती त्यानुसार 19 मे 2021 पासून महावितरण कडून विज कनेक्शन देण्यात आले.
वीज बिलाचा भरणा करून देखील महावितरणचे अधिकारी शाखा अभियंता गणेश श्रीखंडे यांनी सदर ठिकाणी ची वीज तोडण्यासाठी आले असता रीतसर वीज कनेक्शन असल्याचे व त्याचे महावितरणचे बिल भरणा केला असल्याचे दाखवल्याने सदर कारवाई टळली.
महावितरणच्या सावळ्या गोंधळाचा नागरिकांना त्रास होत असून याचा अनुभव केसनंद मध्ये नागरिकांना आल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले होते. या प्रकाराने नागरिकांनी महावितरणकडे रीतसर वीज जोडणी घेऊन आलेल्या वीज बिलाचा भरणा करून देखील महावितरणचे कर्मचारी विज जोडणी तोडण्यासाठी आल्याने महावितरण बाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.
रीतसर विजेचे कनेक्शन घेऊन वीज बिलाचा भरणा करून देखील महावितरणकडून जाणीवपूर्वक नागरिकांना त्रास दिला जात आहे. याबाबत मुख्य अभियंता पुणे ग्रामीण यांच्याकडे रितसर तक्रार करण्यात येणार आहे.
-प्रमोद हरगुडे,ग्रामपंचायत सदस्य केसनंद
वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या यादीनुसार हरगुडे यांचे कनेक्शन तोडण्यासाठी गेलो होतो. मात्र रीतसर विजबिल पाहिल्याने सदर कारवाई करण्यात आली नाही.
गणेश श्रीखंडे,
-शाखा अभियंता, महावितरण वाघोली