मुंबई – बॉलिवूडसह मराठी चित्रपट सृष्टीत असे अनेक कलाकार आहेत. जे चालू घडामोडींवर सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य करत असतात. अशा कलाकारांना अनेकदा ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडताहेत यामुळे सध्याचे राजकारण हा सगळीकडेच चर्चांचा विषय आहे. मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेल्या सध्याच्या ट्विटमुळे वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे.
केदार शिंदे हे सोशल मीडियावर चांगलेच ऍक्टिव असतात. त्यामुळे त्यांनी केलेले ट्विट नेहमीच व्हायरल होतात. त्यामुळे त्यांनी ट्विटरवर व्यक्त केलेली भावना सध्या लक्षवेधी ठरत आहे. शिंदे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, व्यक्तीपेक्षा विचार महत्वाचा, तो सांभाळतो, तोच खरा वारसदार !. शिंदे यांच्या या ट्विटच्या टायमिंगबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
व्यक्ती पेक्षा विचार महत्वाचा!!! तो सांभाळतो, तोच खरा वारसदार!!
— 🄺🄴🄳🄰🅁 🅂🄷🄸🄽🄳🄴 (@mekedarshinde) July 23, 2022
केदार शिंदे यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी भरगोस प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळते. केदार शिंदे यांनी या ट्विटमध्ये कोणाचे नाव जरी घेतलेले नसले तरी नेटकऱ्याना मात्र शिंदे यांचा रोख कोणाकडे आहे हे समजल्याचे दिसून येते. केदार शिंदे यांच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या आगामी चित्रपटाची संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे. अभिनेता अंकुश चौधरी या चित्रपट प्रमुख भूमिका साकारतोय.