नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आयटीआयच्या कौशल्य दीक्षांत समारंभाला संबोधित केले. पंतप्रधान म्हणाले, प्रथमच आयटीआयच्या 9 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा कौशल्य दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. 40 लाखांहून अधिक विद्यार्थी आभासी माध्यमातून आमच्याशी जोडले गेले आहेत. मी तुम्हा सर्वांना कौशल दीक्षांत समारंभाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.
पंतप्रधान म्हणाले, आपल्या देशातील पहिली आयटीआय 1950 मध्ये स्थापन झाली. त्यानंतरच्या सात दशकांत 10 हजार आयटीआयची स्थापना झाली. आमच्या सरकारच्या 8 वर्षात देशात सुमारे 5 हजार नवीन आयटीआय निर्माण झाल्या आहेत. गेल्या 8 वर्षात आयटीआयमध्ये 4 लाखांहून अधिक कौशल्य विकास नवीन जागांची भर पडली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील तरुणांना ‘कौशल्य, रीस्किलिंग आणि अपस्किलिंग’चा मंत्र दिला आणि बदलत्या काळानुसार त्यांची कौशल्ये सतत वाढवण्याचे आणि नवनवीन प्रयोग करण्याचे आवाहन केले. भारतातील कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी केंद्र 5,000 हून अधिक नवीन ‘स्किल हब’ उघडणार असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.