चिंबळी – मोशी-चिंबळी हद्दीतून वाहत असलेल्या इंद्रायणी नदीवरील के टी बंधा-याचे काम जलद गतीने व्हावे अशी मागणी परिसरातील नागरिकांना केली आहे. या बंधाऱ्याच्या दुरूस्तीसाठी शासनाकडून 40 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या बंधाऱ्याच्या मोऱ्यांचे काम वर्षभरापासून सुरु असून अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पाण्याअभावी परिसरातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे नुकसान होत आहे.
पाटबंधारे विभागाने कामासाठी खोदलेल्या बंधाऱ्याच्या मो-यांचे काम अध्याप अर्पुण आहे. त्यामुळे बंधा-यात पाणीच साचत नाही. शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.