मुंबई – कंगना मुंबईत येण्यापूर्वीच मुंबईतील पाली हिल परिसरात असलेल्या कंगना राणावतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेचा हातोडा पडला आहे. पालिकेने सकाळी 11 वाजताच्या सुमारास ऑफिसचे टाळे तोडून कारवाईला सुरुवात केली. पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई सुरु करण्यात आली. याच प्रकरणात अनेकजन स्तरातून प्रतिक्रिया देत आहे.
दरम्यान, इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या वृत्तानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कंगनाने राज्य सरकारविरोधात वक्तव्ये केल्यानंतर एका दिवसात तिचे कार्यालय पाडण्यात आले. याविषयी राज्यपाल नाराज आहेत. त्यांनी आपल्या भावना उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यास मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजॉय मेहता यांना बोलावले होते.’
तत्पूर्वी, कंगना हिच्या मुंबईतील बंगल्यात जे अनाधिकृत बांधकाम झाले आहे, त्या संबंधात मुंबई महापालिकेने तिला दोन वर्षांपुर्वीच नोटीस दिली आहे आणि त्याच वेळी ती या नोटीशीच्या विरोधात कोर्टातपण गेली होती अशी माहिती उपलब्ध झाली आहे. कंगनाच्या बंगल्याचे बांधकाम केवळ 24 तासांची नोटीस देऊन कसे पाडले असा प्रश्न उपस्थित केला जात होता त्या पार्श्वभूमीवर महापालिका सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे.