नगर – के.के.रेंजसाठी नगर दक्षिण मतदारसंघातील तीन तालुके आणि तेवीस गावात करण्यात येणाऱ्या भूसंपादनाबाबत केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करुन शेतकर्यांना दिलासा द्यावा आशी मागणी खा. डॉ. सुजय विखे यांनी केली.
संसदेच्या अअर्थसंकल्पिय अधिवेशनात शून्य प्रहारात खा. विखे पाटील यांनी के.के.रेंज संदर्भात प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. याबाबत बोलताना खा. विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील के.के.रेंजचा विषय अतिशय संवेदनशील झाला असून, यापूर्वी 40हजार हेक्टर क्षेत्रावरील जमिनीचा उपयोग भारतीय लष्कराच्या सरावासाठी करण्यात येतो. 1980 साली 25 हजार हेक्टर अतिरिक्त जीमीनही सुरक्षा विभागास देण्यासाठी सूचना करण्यात आली होती. या गावांचा विकास पूर्णपणे थांबला असल्याकडे विखे यांनी सरकारचे लक्ष वेधले.