Jitendra Awhad : शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. असे असतानाच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला देण्यात आला. या निकालाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर काल सोमवारी सुनावणी पार पडली. अजित पवार गटाला खरी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) घोषित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यामुळे शरद पवार गटाला दिलासा मिळू शकलेला नाही.
याप्रकरणी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या याचिकेची तपासणी करण्यास तयार असल्याचे न्यायालयाने सांगितले. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 3 आठवड्यांनी निश्चित केली आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ हे नाव कायम राहील, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
या सुनावणीदरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आमदार जितेंद्र आव्हाड सर्वोच्च न्यायालयात हजर होते. या सुनावणीवेळी न्यायालयाने महत्त्वाच्या बाबी नोंदवत अजित पवार गटाला फटकारलं. त्याच पार्श्वभूमीवर, जितेंद्र आव्हाड यांनी न्यायालयाच्या नोंदीचा दाखला देत अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी ट्वीट शेअर केले आहे.
जितेंद्र आव्हाड ट्वीट –
“सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपल्यानंतर दिल्लीतून विमान पकडून आताच मुंबईत आलो. प्रवासातील दोन तासात डोकं चक्रावून गेलं होतं. आज जे काही सर्वोच्च न्यायालयात घडलं, अन् सुनावणी दरम्यान जे काही दोन न्यायाधीशांच्या तोंडून ऐकलं. ते यातना देणारं होतं,” असे आव्हाड यांनी म्हंटले आहे.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपल्यानंतर दिल्लीतून विमान पकडून आताच मुंबईत आलो. प्रवासातील दोन तासात डोकं चक्रावून गेलं होतं. आज जे काही सर्वोच्च न्यायालयात घडलं, अन् सुनावणी दरम्यान जे काही दोन न्यायाधीशांच्या तोंडून ऐकलं. ते यातना देणारं होतं. महाराष्ट्रात अजित पवार यांनी…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 19, 2024
पुढे त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, “महाराष्ट्रात अजित पवार यांनी केलेल्या राजकारणाची तुलना न्यायाधीशांनी थेट पाकिस्तानातील राजकारणाशी केली, याची लाज वाटली. एखाद्याला जर जनाची नव्हे तर मनाची लाज असेल तर आपण केलेले कृत्य हे सर्वोच्च न्यायालयाने मारलेली थापड आहे, हे ओळखून राजीनामा देईल. पण, शरद पवार यांना संपवण्यासाठी ज्या पातळीवर हे लोक घसरले आहेत. त्यांच्याकडून अशी अपेक्षाच ठेवणे चुकीचे आहे. पण, महाराष्ट्राच्या राजकारणाचे स्वरूप पाकिस्तानातील राजकारणाशी समरूप साधतंय, हे दोन न्यायाधीशांच्या तोंडून ऐकलं, हे मराठी माणूस म्हणून मला खूपच खेदजनक वाटतंय,” असे म्हणत आव्हाड यांनी अजित पवार गटावर हल्लाबोल केला आहे.
हा मतदारांचा विजय आहे – शरद पवार
तर दुसरीकडे शरद पवार यांनी देखील कोर्टाच्या निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभदिनी दिवशी, भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अंतरिम दिलासा दिला आहे. हा मतदारांचा विजय आहे, कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने देशातील मतदारांना कमी लेखू नये असे निरीक्षण नोंदवले आणि मूळ पक्षाच्या तिकिटावर उमेदवार लढले त्याचे काय!, असा प्रश्न देखील उपस्थित केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभदिनी दिवशी, भारताच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अंतरिम दिलासा दिला आहे.
हा मतदारांचा विजय आहे, कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने देशातील मतदारांना कमी लेखू नये असे निरीक्षण नोंदवले आणि मूळ पक्षाच्या…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 19, 2024
“आम्हाला पूर्णपणे मान्यता देऊ नये या मागणीवर जोरदार टीका करण्याव्यतिरिक्त, अशाच वादामुळे अंतिम मुद्यावरील संबंधित परिस्थितीचा उल्लेख केला आहे.मध्यंतरी आम्हाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ म्हणून मान्यता दिल्याबद्दल आणि माननीय ECI ला आमच्या चिन्हासाठी आमच्या अर्जावर ७ दिवसांच्या आत विचार करण्याचे निर्देश दिल्याबद्दल आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. लोकशाहीचा हा मोठा विजय आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानासाठी आम्ही लढत राहू. सत्यमेव जयते!”, असे शरद पवार यांनी ट्वीटमध्ये म्हंटले आहे.