सुरूवातीच्या कलांमध्ये भाजप पिछाडीवर
रांची : झारखंड विधानसभेच्या 81 जागांवरील मतमोजणीआज होणार आहे. या निवडणूकीत मुख्यमंत्री रघुवीर दास यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर रघुवीर दास यांचे पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न धुळीस मिळवण्याची तयारी हेमंत सोरेन यांनी केलेली दिसत. दरम्यान, सुरूवातीच्या कलांमध्ये भाजप पिछाडीवर आहे. तर 67 मतदारसंघ नक्षलग्रस्त भागात येतात. त्यामुळे पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर आहे. एकूण 24 केंद्रावर मतमोजणी होणार आहे. 1 हजार 215 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे.
Jharkhand: Counting of votes for all 81 assembly constituencies of the state is underway. Visuals from a counting centre in Ranchi. #JharkhandAssemblyPolls pic.twitter.com/KXtHBu6dr8
— ANI (@ANI) December 23, 2019
मतमोजणी 28 फेऱ्यांमध्ये होणार असून सर्वात कमी दोन फेऱ्या चंदनकियारी आणि तोरपा जागांवर होणार आहे. सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची चिन्हे आहे. झारखंडमध्ये 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत पाच फेऱ्यांमध्ये मतदान झाले होते. सर्व जागांवरील मतदान हे ईवीएम मशिनमध्ये बंद झाले आहे.