manoj jarange patil : नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मुंबईत संविधान सन्मान सभा पार पडली. या सभेमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी अनेक मुद्यांवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. अशात राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच चर्चेत आला आहे. अशात प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून त्यांना मोल्लाचा सल्लाही दिला आहे.
मराठा आरक्षणाबाबत भाष्य करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “जोपर्यंत निजामी मराठा सत्तेत आहे, तोपर्यंत रयतेच्या मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही.’
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले,’सल्लागारांचं बिलकुल ऐकू नका. सोनिया गांधींनी जी चूक केली होती, ती करू नका,” असं आवाहन त्यांनी केलं. “जरांगे पाटील यांनी एवढंच तारतम्य बाळगावं, जी चूक सोनिया गांधी यांनी ‘मौत का सौदागर’ असे शब्द वापरुन केली, तशी चूक करू नये. जरांगे यांनीही आरक्षणाच्या या लढाईत आपण भेदभाव करतोय, वेगळेपणा आणतो, असं कृपा करुन आणू नये,” अस म्हणत जरांगे पाटील यांना सल्ला आहे