नवी दिल्ली – अवघ्या जगाला आपल्यापुढे गुढगे टेकायला लावणाऱ्या कोरोना विषाणूविरोधात आज भारताने युद्ध पुकारले. या युद्धाची सुरुवात आज देशवासीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार कोरोनाविरोधात देशाचं नेतृत्व करणाऱ्यांना सलाम करत केली. आज देशभरामध्ये उस्फुर्तरित्या पाळला जात असलेल्या ‘जनता कर्फ्यू’दरम्यान देशवासीयांनी सायंकाळी पाच वाजता डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ आणि पोलिसांचे आभार टाळ्या वाजवून मानले. यानंतर पंतप्रधानांनी ट्विटरद्वारे देशवासीयांच्या नावे संदेश देत हा लढा कायम ठेवण्याचे आवाहन केले.
मोदींनी ट्विटद्वारे म्हटलं, “हा कोरोनाविरोधात देशाचं नेतृत्व करणाऱ्यांप्रती धन्यवादचा नाद असून आज आपण एका मोठ्या लढाईला सुरुवात करण्याचा हा शंखनादही केला आहे. ही मोठी लढाई जिंकण्यासाठी आपण स्वतःला बंधनात बांधून घेऊयात”
आपल्या संदेशामध्ये पंतप्रधानांनी देशवासीयांचे आभार मानताना, ‘आज रात्री ९ जनता कर्फ्यू समाप्त होत असला तरी हा विजय साजरी करण्याचा क्षण नसून आपल्याला कोरोनाविरोधातील लढाई सुरु ठेवायची आहे.’ अशी आठवण करून दिली.
आज का #JantaCurfew भले ही रात 9 बजे खत्म हो जाएगा, लेकिन इसका मतलब यह नहीं है कि हम सेलिब्रेशन शुरू कर दें। इसको सफलता न मानें। यह एक लम्बी लड़ाई की शुरुआत है। आज देशवासियों ने बता दिया कि हम सक्षम हैं, निर्णय कर लें तो बड़ी से बड़ी चुनौती को एक होकर हरा सकते हैं।
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2020