जम्मू – जम्मू-काश्मीर राज्य असताना जम्मू विभागाकडे आर्थिक केंद्र म्हणून पाहिले जात होते. पण, तो विभाग भाजपच्या राजकीय खेळींचा सर्वांत मोठा बळी ठरला आहे, असे टीकास्त्र माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी मंगळवारी सोडले. भाजपकडून विभाजनाचे आणि लबाडीचे राजकारण केले जात आहे.
काश्मिरी पंडितांच्या दुर्दशेसाठी भाजपचे धोरण कारणीभूत – मल्लिकार्जुन खर्गे
देशातील बड्या उद्योगांना लाभ मिळवून देण्यासाठी त्या पक्षाने जनहित बाजूला ठेवले आहे. एकेकाळी जम्मू विभागाला अर्थकारण, संस्कृती आदींविषयी अभिमान वाटायचा. पण, त्या सगळ्यांचीच लुट भाजपने केली आहे. देशभरातील बड्या उद्योगांनी जम्मूत खोलवर शिरकाव केला आहे. त्या विभागातील बेरोजगारीचा दर धडकी भरवणारा आहे.
स्टार लेबलिंगमुळे नवीन वर्षात फॅनच्या किमती 20 टक्क्यांनी वाढणार
विकास ठप्प झाला आहे. दहशतवादानेही जम्मू विभागात पुन्हा डोके वर काढले आहे. जम्मूला भेडसावणाऱ्या समस्या काश्मीरपेक्षा कमी नाहीत. जम्मूतील तरूणही अंमली पदार्थांच्या व्यवसानाच्या आहारी जात आहेत, असे मेहबुबा पक्षाच्या बैठकीत बोलताना म्हणाल्या.
काश्मीरमधील जनतेला भाजपच्या हेतूंबद्दल नेहमीच साशंकता वाटते. मात्र, राजकीय आणि आर्थिक सबलीकरणाच्या आश्वासनांना भुलून जम्मूतील मतदारांनी भाजपला 2014 मधील विधानसभा निवडणुकीत झुकते माप दिले. त्यावेळी जम्मूतील जनतेच्या आकांक्षांचा आदर राखण्यासाठी पीडीपीने पक्षहिताची तमा बाळगली नाही, असे नमूद करत त्यांनी भाजपशी केलेल्या युतीचा संदर्भ दिला.
त्या निवडणुकीत पीडीपीला 28, तर भाजपला 25 जागा मिळाल्या. नॅशनल कॉन्फरन्सला 15, तर कॉंग्रेसला 12 जागांवर समाधान मानावे लागले. पीडीपी आणि भाजपने एकत्र येत सरकार स्थापन केले. मात्र, भाजपने मैत्री तोडल्याने ते सरकार तीन वर्षांनी जून 2018 मध्ये कोसळले. त्यानंतर वर्षभराने भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घटनेचे कलम 370 हटवून जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्दबातल केला. तसेच, जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले.