नवी दिल्ली – काश्मिरी पंडितांच्या दुर्दशेला भाजपचे धोरण कारणीभूत आहे. वापरा, दुर्लक्ष करा आणि विश्वासघात करा असे त्या पक्षाचे धोरण आहे, असे टीकास्त्र कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोडले. मागील वर्षी मेमध्ये दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये राहुल भट या काश्मिरी पंडित असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याची हत्या केली. त्यामुळे सुरक्षेविषयी चिंताग्रस्त असलेल्या काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यातून त्यांनी बेमुदत निदर्शने सुरू केली आहेत.
स्टार लेबलिंगमुळे नवीन वर्षात फॅनच्या किमती 20 टक्क्यांनी वाढणार
त्यामध्ये कामबंद आंदोलनाचाही समावेश आहे. सुरक्षास्थितीत सुधारणा होईपर्यंत काश्मीर खोऱ्याबाहेर नियुक्त्या करण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे. काहींनी जीविताला असलेल्या धोक्याकडे लक्ष वेधत काश्मीर खोरे सोडले. त्या घडामोडींचा संदर्भ देऊन खर्गे यांनी केंद्र सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपवर ट्विटरवरून निशाणा साधला. काश्मिरी पंडित कर्मचारी 245 हून अधिक दिवसांपासून निदर्शने करत आहेत. जगण्याचा अधिकार आणि बदली आदींची मागणी ते करत आहेत. मात्र, त्यांचे वेतन रोखले जात आहे. त्यांच्या सुरक्षेशी तडजोड केली जात आहे, असे त्यांनी म्हटले.
Shivsena: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल पुन्हा लांबला; आज काय झाले ते पहा
शहांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी-नॅशनल कॉन्फरन्स
जम्मू-काश्मीरमध्ये सध्या अनिश्चिततेची स्थिती आहे. दहशतवाद्यांकडून टार्गेट किलिंगचे सत्र सुरू असल्याने भीतीचे वातावरण आहे. त्यातून जनतेला बाहेर काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात यावी, अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्सने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उद्देशून केली. जम्मू-काश्मीरमधील स्थिती हाताळण्यात नायब राज्यपालांच्या प्रशासनाला सपशेल अपयश आले आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, भरती घोटाळे, नागरी सुविधांचा अभाव या समस्यांनी जनता त्रस्त आहे, अशा आरोपांची सरबत्तीही त्या पक्षाने केली.