पिंपरी- पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत वाहणाऱ्या मुळा, मुठा व इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी साठली आहे. ही जलपर्णी काढण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून करोडो रुपयाची तरतूद करयात येते. मात्र, जलपर्णी काढण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून चालढकल केली जात आहे. यामुळे सोमवारी (दि.12) रयत विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी पिंपळे निलख येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलाखालील जलपर्णी काढली. ही जलपर्णी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना गुढीपाडव्या निमित्ताने भेट देणास असल्याचे रयत विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी सांगितले.
जलपर्णी काढण्याबाबत अनेकदा रयत विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी महापालिका प्रशासनास निवेदने दिली. मात्र, याबाबत आरोग्य अधिकारी अनिल रॉय व पर्यावरण विभाग अभियंता संजय कुलकर्णी यांनी जवाबदारी ढकलण्याचा काम केले. तर, अनिल रॉय हे ठेकेदार साई प्राइड यांना पाठीशी घालण्याचे काम करतात. अनेकदा पाठपुरवठा करून सद्धा महानगरपालिकेला जाग न आल्याने रयत विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी सोमवारी (दि.12) स्वतः नदीपात्रात उतरून जलपर्णी काढली असून आता तीच जलपर्णी भेट म्हणून देणार आहेत. यावेळी परिषदेचे अध्यक्ष सुर्यकांत सरवदे, रविराज काळे, अक्षय कोथिंबीरे, ओमकार भोईर, ऋषिकेश कानवटे, योगेश गायकवाड, विशाल नागटिळक, अक्षय माहुलकर, अजय चव्हाण, दिव्या जोशी, मनोज शर्मा, मनोज गुरव, बालाजी काकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.