नवी दिल्ली – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर केला. गेल्या काही महिन्यांपासून कोश्यारी हे आपल्या विधानांमुळे चांगलेच चर्चेत आले होते. अखेर राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा मंजूर केला. यानंतर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावर आता राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया देत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे तर दुसरीकडे मात्र केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी यावर भाष्य करतांना दुःख राज्यपालांच्या कामाचे कौतुक केले आहे
रावसाहेब दानवे काय म्हणाले
“भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून राजभवनात बसून राजकारभार हाकणे ऐवढंच नाही, तर ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम केलं. महाविकास आघाडीला हे काम पसंत नव्हतं. म्हणून महाविकास आघाडीने सातत्याने त्यांच्यावर आरोप केले. पण, आपल्या मूळ गावाकडे सामाजिक काम करण्याची इच्छा व्यक्त करत राज्यपालांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती,” असं दानवेंनी सांगितलं.