मुंबई – ‘व्हाय आय किल्ड गांधी’ (Why I Killed Gandhi) या सिनेमाला विरोध होणं स्वाभाविक आहे. विविध मान्यवरांनी या आधीच त्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अमोल कोल्हे यांनी 2017 साली या चित्रपटातली भूमिका केली होती. त्यावेळेस ते राजकारणात कार्यरत नव्हते. त्याबद्दल त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जाऊन आत्मक्लेशसुद्धा केला आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.