संगमनेर – कोविडच्या काळात संगमनेर तालुक्यातील अनेक लोक मृत्युमुखी झाले असून रुग्णांची खाजगी दवाखान्यांमार्फत सर्वात जास्त लूट झाली. स्वतः काही न करता गरीब
कल्याणकारी योजनेला अप्रत्यक्षपणे विरोध करायचा त्यामुळे येथील नेतृत्वाच्या मानसिकतेची कीव येते असे वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाव न घेता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर केले.
संगमनेरातील शारदा शिक्षण संस्थेच्या मालपाणी विद्यालयात रविवारी (दि. ३१) राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या नोंदणी आणि तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी राधाकृष्ण विखे पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, दंडकारण्याच्या नावाखाली गेल्या 15 वर्षांपासून वृक्षारोपण सुरू आहे त्यामाध्यमातून संगमनेर तालुक्यात जंगलं दिसायला पाहिजे परंतु अजूनही तालुक्यातील डोंगर बोडखेच आहेत असा टोला ही विखे यांनी महसूलमंत्री थोरात यांना लगावला.