मुंबई : राज्यातील सत्तानाट्याचा संघर्ष अधिकच तीव्र होत चालला आहे. सध्या महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले असताना उद्याच बहुमत सिद्ध करा असे आव्हान राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना दिले.
राज्यपाल दिल्लीच्या इशाऱ्यावर चालतायत का ?
सध्याच्या राजकीय स्थितीवरून काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हंटले की महाविकास आघाडीच्या वतीने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला जाईल. पण सध्याच्या राजकीय परिस्थितीत दोन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा असा की, देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याच्या आधीच विश्वास दर्शक ठरावाचा द्राफ्ट हा लीक झाला होता. तो माध्यमांनी चालवला देखील होता. म्हणजेच राज्यपाल दिल्लीच्या इशाऱ्यावर चालतायत का ? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.
उद्या जर विश्वास दर्शक ठराव मंडला गेला तर फुटीर आमदारांनी विरोधात मतदान केले तर ते डिसक्वालिफाय होतील. ते जर गैरहजर राहिले तरीही ते डिसक्वालिफाय होतील.शिवसेना आजही ५५ आमदारांचा गट आहे त्यांच्यातील फूट अद्यापही मान्य झालेली नाही. विधिवत फूट मान्य करण्याचा अधिकार केवळ अध्यक्षांनाच आहे. ती फूट न होता त्यांनी विरोधी मतदान केलं तर त्यांचे सदस्यत्व निलंबित होऊ शकते.
आता देवेंद्र फडणवीस यांचा हाच डाव आहे एकदा त्या सदस्यांचे निलंबन झाले की आपल्याला बहुमत आपोआपच मिळते. असे देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटल आहे.