महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. नक्षलवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला केला आहे. जांभूळखेडा गावाजवळ ही घटना घडली असून, या हल्ल्यात 15 जवान शहीद झाले आहे. या भ्याड हल्ल्याचं सर्व स्तरातून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे. बॉलिवूड अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी देखील या हल्ल्याबद्दल आपल्या ट्विटर आकाउंटवरून निषेध व्यक्त केला आहे.
निषेध! ह्या नक्षलवाद्यांचा निषेध, ह्या भ्याड हल्ल्याचा निषेध! ज्या सुरक्षा कर्मींचे प्राण गेले त्या शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली. एकीकडे आतंकवाद तर दुसरीकडे नक्षलवाद, आपल्या सुरक्षा कर्मींच्या प्राणाचे काहीच मोल नाही का? त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची? असा सवाल त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
निषेध! ह्या नक्षलवाद्यांचा निषेध, ह्या भ्याड हल्ल्याचा निषेध! ज्या सुरक्षा कर्मींचे प्राण गेले त्या शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली. एकीकडे आतंकवाद तर दुसरीकडे नक्षलवाद, आपल्या सुरक्षा कर्मींच्या प्राणाचे काहीच मोल नाही का? त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची? https://t.co/2HsY5elrna
— Renuka Shahane (@renukash) May 1, 2019