मुंबई – आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 20 व्या सामन्यात राजस्थानच्या संघानं लखनौसमोर 166 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या राजस्थानच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून 165 धावा केल्या आहेत.
Innings Break!@SHetmyer scores a fine 5⃣9⃣* and guides @rajasthanroyals to 165/6. 👏 👏
The @LucknowIPL chase will begin shortly. 👍 👍
Scorecard 👉 https://t.co/8itDSZ2mu7#TATAIPL | #RRvLSG pic.twitter.com/0GKqj18833
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2022
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 67 धावांवर आपले पहिले चार विकेट गमावल्या होत्या. पण शिमरॉन हेटमायर आणि रविचंद्रन अश्विन यांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली आणि संघाला चांगल्या स्थितीत नेले. हेटमायरने नाबाद 59 धावा केल्या. शिमरॉन हेटमायरने 33 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. होल्डरच्या षटकात लागोपाठ दोन षटकार मारून त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. अश्विनने 23 चेंडूत 28 धावा करून रिटायर्ड आउट ( retired out ) झाला. याव्यतिरिक्त देवदत्त पडिक्कल याने 29 चेंडूत 29 धावा केल्या. राजस्थानने शेवटच्या पाच षटकांत 73 धावा केल्या आणि लखनौसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली.
शिमरॉन हेटमायरची कॅच सोडणं पडलं महागात
क्रुणाल पांड्याने शिमरॉन हेटमायरला मोठं जीवदान दिलं. कृष्णप्पा गौतमच्या तिसऱ्या षटकातील पहिला चेंडूवर हेटमायरचा सोप्पा झेल कृणाल पंड्याने सोडला. त्यावेळी हेटमायर 15 धावांवर खेळत होता.
लखनौकडून होल्डर आणि कृष्णप्पा गौथम यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर, आवेश खाननं एक विकेट्स मिळवली.