दुबई – यंदाची आयपीएल स्पर्धा करोनाच्या धोक्यामुळे भारताऐवजी अमिरातीत होत आहे. करोनामुळे प्रेक्षकांना देखील परवानगी नाकारल्याने रिकाम्या स्टेडियममध्येच सामने होत आहेत. पण, या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना परवानगी नाकारल्याचा सर्वाधिक फटका खेळाडूंना व पंचांनाच बसत आहे.
चौकार किंवा षटकार मारला गेल्यावर हा चेंडू प्रेक्षकच खेळाडूंकडे पुन्हा देत होते. मात्र, आता प्रेक्षकच नसल्याने हा चेंडू आणण्याचे अतिरिक्त कार्यही खेळाडूंनाच करावे लागत आहे. तसेच जर चेंडू सापडलाच नाही तर मैदानावरील पंच दुसरा चेंडू मागवतात. हे टाळण्यासाठी मैदानावर बॉल पिकर्स का ठेवले जात नाहीत, असा प्रश्न निर्माण होत आहे.