नवी दिल्ली – आयपीएल स्पर्धा खेळाडूंना केवळ पैसा मिळवून देते असे आरोप सातत्याने केले जात आहेत. मात्र, खेळाडूंना त्यांची गुणवत्ता सिद्ध केल्यावर त्यांच्या देशाकडूनही खेळण्याची व आपला दर्जा सिद्ध करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धा केवळ पैशांसाठी नव्हे तर प्रतिभेसाठी व गुणवत्तेसाठी एक योग्य व्यापीठ आहे, असे मत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केले आहे.
आयपीएलचे टीव्ही व डीजिटल प्रसारण हक्क तब्बल 48 हजार 390 कोटी रूपयांना विकले गेल्यामुळे या स्पर्धेने आपला खरा हेतू सिद्ध केला आहे. ज्या खेळाडूंच्या कामगिरीमनुळे ही स्पर्धा यशस्वी होत आहे त्यांनाच केंद्रस्थानी ठेवून आज जगभरात या स्पर्धेचे हक्क विकत गेण्यासाठी मोठी स्पर्धा रंगली होती. जर ही स्पर्धा अपयशी ठरली असती तर हे चित्र दिसलेच नसते.
ही स्पर्धा खेळाडूंना श्रीमंत बनवण्यासाठीच आहे असे बोलले गेले मात्र, या स्पर्धेमुळे जागतिक क्रिकेटला नवनवे दर्जेदार खेळाडूही मिळाले हे विसरून चालणार नाही. आयपीएल स्पर्धेमुळे क्रिकेटचा विकास व प्रगती दोन्ही साध्य होत आहे, असेही गांगुली यांनी सांगितले.