मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात रंगलेल्या राजकीय नाट्याचा अखेर काल शेवट झाला. त्यानंतर आता राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे.
दरम्यान, उद्या सायंकाळी शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी राज्यातील आणि देशातील राजकीय क्षेत्रातील अनेकजणांना आमंत्रण देण्यात येणार आहे.
तसेच, उद्याच्या शपथविधी सोहळ्यासाठी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील ४०० शेतकऱ्यांना आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला देखील निमंत्रण दिले आहे.