नवी दिल्ली – महागाईवर लोकसभेत झालेल्या चर्चेवेळी भाजपचे सदस्य जयंत सिन्हा यांनी अजब भूमिका मांडली. त्यामुळे देशात महागाई असल्याचेच भाजपला अमान्य असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे. विरोधक महागाईचा शोध घेत आहेत. पण, ती त्यांना सापडत नाही. कारण, महागाई अस्तित्वातच नाही.
आकडेवारीने पोट भरत नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले. ते खरेच आहे. मी मतदारसंघात जातो त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमचे पोट भरण्याची निश्चिती केल्याचे लोक सांगतात. करोना संकट काळात सर्व गरिबांना मोफत धान्य पुरवण्यात आले. गरिबाची थाळी पाहून त्याला भाताची किंमत विचारा. तो मोफत असल्याचे सांगेन. डाळही कमी किमतीत उपलब्ध आहे.
देशात 8 वर्षांपूर्वी 10 ते 15 रूपयांना भाज्या मिळायच्या. आजही जवळपास तेवढेच दर आहेत. करोना संकट आणि युक्रेन पेचामुळे उद्भवलेल्या महागाईच्या प्रभावापासून जनतेचा बचाव करण्यासाठी सरकारने पाऊले उचलली. गरिबाची थाळी खाद्यपदार्थांनी भरलेली असेल याची निश्चिती केली, असे माजी केंद्रीय अर्थ राज्यंमत्री असणाऱ्या सिन्हा यांनी म्हटले.