अहमदाबाद – नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज होत असलेल्या सामन्यात विजय प्राप्त करत निर्विवाद वर्चस्व मिळवण्याची संधी आहे. या दोन संघातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता हा तिसरा सामना जिंकत वेस्ट इंडिजला व्हाइटवॉश देण्यासाठी भारतीय संघ सज्ज बनला आहे.
तिसरा एकदिवसीय सामना
वेळ – दुपारी 1ः30 पासून
ठीकाण – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
थेट प्रक्षेपण – स्टार नेटवर्क
रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धची पहिली लढत जिंकताना थाटात सुरुवात केली. त्यानंतर दुसरा सामनाही जिंकला व विजयी आघाडी घेतली. आता या सामन्यात विजय मिळवत थोडीफार प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांना कामगिरीत खूपच प्रगती करावी लागणार आहे. दोन्ही संघांचे बलाबल पाहता भारतीय संघाचीच बाजू वरचढ राहणार आहे. अर्थात, संघातील नावाजलेल्या फलंदाजांनी कामगिरीत सातत्य राखणे महत्त्वाचे आहे. विराट कोहलीचे अपयश ही संघासाठी सर्वाधिक चिंतेची बाब ठरत आहे. पहिल्या सामन्यात कर्णधार रोहितने अर्धशतकी खेळी केली होती, तर दुसऱ्या लढतीत सूर्यकुमार यादवने खेळी केली. तसेच संघात परतलेल्या लोकेश राहुलने 49 धावांची खेळी केली. हे दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकले असले तरीही संघातील फलंदाजांना सातत्यात येत असलेले अपयश हीच चिंतेची बाब आहे. गोलंदाजीत भारतीय संघ वेस्ट इंडिजपेक्षा जास्त सरस वाटत आहे. या आधीच्या सामन्यातही हेच सिद्ध झाले होते.
दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर कसे खेळायचे याचेच उत्तर सापडलेले नाही. त्यातच त्यांना नियमित कर्णधार कॅरन पोलार्ड याला दुखापतीने दुसरा सामना मुकावा लागला होता. आता तिसऱ्या सामन्यात तरी तो संघात परतेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्याकडेही बलाढ्य फलंदाज आहेत. मात्र, त्यांना भारताच्या फिरकीसह वेगवान गोलंदाजांच्या स्विंग गोलंदाजीसमोरही खेळपट्टीवर उभे राहता येत नसल्याचेच दिसून आले आहे.
कोहलीचे काय होणार
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला या मालिकेतील दोन्ही सामन्यात मोठी खेळी करता आलेली नाही. पहिल्या सामन्यात 8 तर, दुसऱ्या सामन्यात 18 धावा त्याच्या नावासमोर आहेत. गेल्या जवळपास दोन वर्षांत कोहलीच्या बॅटमधून शतकी खेळी साकार झालेली नाही. त्यातच रोहित शर्माने संघात प्रयोग करणार असल्याचे सांगितल्यामुळे आता कोहली तिसऱ्या सामन्यात संघात स्थान मिळेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मात्र, तिसरा सामना जिंकून व्हाइटवॉश टाळण्यासाठी त्यांना फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व नेतृत्व या सर्वच क्षेत्रात भारतापेक्षा सरस कामगिरी करावी लागणार आहे. ही मालिका संपल्यावर दोन्ही संघ कोलकाता येथे रवाना होणार आहेत. कोलकातातील ईडन गार्डन मैदानावर या दोन संघात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. हे सामने येत्या 16, 18 व 20 फेब्रुवारीला होणार आहेत.