#INDvAUS Final : भारतीय क्रिकेट टीम चौथ्यांदा वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (NDvAUS Final) पोहोचली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये टीम इंडियाचा सामना पाचवेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु आहे. आज दुपारी 2 वाजता नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामन्याला सुरुवात झाली असून, त्याआधी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस उडवण्यात आला.
नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने गेला. कॅप्टन पॅट कमिन्स याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. तर टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी उतरली आहे. दरम्यान, आजच्या फायनलसाठी क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला पोहचला असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ट्विटच्या माध्यमातून टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत.
All the best Team India!
140 crore Indians are cheering for you.
May you shine bright, play well and uphold the spirit of sportsmanship. https://t.co/NfQDT5ygxk
— Narendra Modi (@narendramodi) November 19, 2023
“ऑल द बेस्ट टीम इंडिया! 140 कोटी भारतीय तुमचा जयजयकार करत आहेत. तुम्ही तेजस्वी व्हा, चांगले खेळा आणि खिलाडूवृत्तीची भावना कायम ठेवा…’ या आशयाचे ट्विट पंतप्रधान मोदींनी केलं आहे. इंडिया-ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांचा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी (Narendra Modi) देखील स्टेडियममध्ये हजेरी लावणार आहेत.
दरम्यान, टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ 20 वर्षांनंतर आयसीसी वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये पुन्हा आमनेसामने आले आहेत. याआधी 2003 मध्ये वर्ल्ड कप फायनलमध्ये दोन्ही संघांचा अंतिम फेरीत आमनासामना झाला होता. तेव्हा कांगारुंनी टीम इंडियाचं वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंग केलं होतं. त्यामुळे आता टीम इंडियाला 20 वर्षानंतर पराभवाचा वचपा घेण्याची संधी आहे.