नवी दिल्ली – यावर्षी भारताची निर्यात ( India’s exports) वाढून 450 अब्ज डॉलर पर्यंत जाण्याची शक्यता फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन ( Federation of Indian Export Organizations) या संघटनेचे अध्यक्ष अश्वनी कुमार यांनी व्यक्त केली.
जागतिक व्यापारावर परिणाम झालेला असतानाच तांबड्या समुद्रात वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. मात्र तरीही भारताची निर्यात या कालावधीत 450 अब्ज डॉलर पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तांबड्या समुद्रातील प्रश्न लवकर संपण्याची शक्यता कमी आहे.
अशा परिस्थितीत छोट्या निर्यातदारांना सरकारकडून मदतीची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. कारण या निर्यातदारांना आफ्रिकेला वळसा घालून निर्यात करणे अधिक खर्चिक पडते.
भारत सरकार निर्यात वाढविण्यासाठी चांगले प्रयत्न करत आहे. त्यामुळे आमची संघटना आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील देशाबरोबर निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे.