ब्लूफाँटेन : रवि बिश्नोई आणि कार्तिक त्यागी यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतील दुस-या सामन्यात जपानचा ४१ धावांत धुव्वा उडवला आहे.
India bowl Japan out for 41!
Ravi Bishnoi the star recording figures of 8-3-5-4 🔥 #U19CWC | #INDvJPN | #FutureStars pic.twitter.com/XoPc3lQk3v
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) January 21, 2020
भारतीय कर्णधार प्रियम गर्ग याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना जपानला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होते. भारतीय गोलंदाजांनी अचूक गोलंदाजीचा मारा करत जपानचा डाव २२.५ षटकांत अवघ्या ४१ धावसंख्येवर गुंडाळला. ४१ पैकी १९ धावा (१२ वाईड व ८ एलबी) या अतिरिक्त आहेत.जपानच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. विशेष म्हणजे जपानच्या ५ फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.
जपानकडून शू नोगुचीने ७, केंटो डोबेलने ७ आणि मैक्सीमिलियनने ५ धावा तर मार्कस थरगटे, युघंधार रेथोरेकर आणि सोरा इचकीने १ धाव केली. भारताकडून गोलंदाजीत रवि बिश्नोईने ८ षटकांत ५ धावा देत सर्वाधिक ४ तर कार्तिक त्यागीने ६ षटकांत १० धावा ३ गडी बाद केले. आकाश सिंहने ४.५ षटकांत ११ धावा देत २ तर विद्याधर पाटीलने ४ षटकांत ८ धावा देत १ गडी बाद केला.